अर्थसंकल्पात स्थिर धोरणात्मक संकेतांची गरज

मुंबई / रमेश औताडे

या वर्षीच्या अर्थसंकल्पात शाश्वत भारताच्या विकासगाथेला कशा प्रकारे अधिक बळकटी मिळू शकते हे निश्चित करण्याची एक मोठी संधी आहे. हवामान बदलाचे धोके आता सर्वत्र अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला स्थिर धोरणात्मक संकेतांची गरज आहे. जेणेकरून स्वच्छ ऊर्जा, लवचिक पायाभूत सुविधा आणि हवामानाशी संबंधित आजीविकेसाठी वित्तपुरवठा करण्यास मदत होईल. असे एयू स्मॉल फायनान्स बँकेचे संस्थापक, एमडी आणि सीईओ संजय अग्रवाल यांनी प्री-बजेट संदर्भात सांगितले.

आम्हाला भारताच्या ‘नॅशनल अ‍ॅडॉप्टेशन प्लॅन’ बद्दल अधिक स्पष्टतेची अपेक्षा आहे, कारण हवामान बदलाचा परिणाम आधीच सोसणाऱ्या समुदायांसाठी आणि क्षेत्रांसाठी ‘अनुकूलन’ अत्यंत कळीचे ठरेल. असा अर्थसंकल्प जो हवामान कृती, विकासाची प्राधान्ये आणि सुशासन यांचा मेळ घालेल, तो अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्था उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!