भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ

मुंबई / रमेश औताडे 

श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो यांच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिझम नेटवर्किंग इव्हिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमात श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींसह भारतातील टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, माईस प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एअरलाईन्स आणि माध्यम प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पर्यटन, व्यापार आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

२०२५ मध्ये श्रीलंकेला २३.६ लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली असून ही विक्रमी संख्या आहे. यामध्ये ५.३१ लाख भारतीय पर्यटकांचा समावेश असून एकूण पर्यटकांपैकी सुमारे २७ टक्के वाटा भारताचा आहे. श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो आणि श्रीलंका एअरलाईन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रीलंकेतील समुद्रकिनारे, सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, योग आणि वेलनेस सुविधांवर प्रकाश टाकला. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून विमान फेऱ्या वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाची पर्यटन बाजारपेठ असून, २०२६ पर्यंत ३० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित करण्याचे लक्ष्य श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरोने जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!