महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पुढील पाच दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाचा अंदाज

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, वाशीम, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार आहे. तसेच पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत यलो अलर्ट कायम राहणार आहे.

११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी पावसाच्या काळात सतर्क राहावे, वीजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे मुंबई वेधशाळेने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!