‘देशात हिंसाचाराचे आणि तणावाचे वातावरण’,पंतप्रधानांसमोरच भाजपचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं प्रतिपादन

राजस्थान:- सध्या देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशातील विविध भागांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.अश्यात राजस्थानमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी संस्था आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने एक ऑनलाईन कार्यक्रम राबविण्यात येत होता.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे एकत्र ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देशात हिंसाचाराचे अनेक तणावाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन केलं. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
काय म्हणाले गेहलोत?
या कार्यक्रमात बोलताना गेहलोत म्हणाले की,’सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनच समाज आणि देशाची प्रगती होऊ शकते पण सध्या देशात तणाव आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. आपल्याला विकासाच्या मार्गावर चालायचे असेल तर हे वातावरण लवकरच दूर केले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अशोक गेहलोत यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचसोबत या वक्तव्याची संपूर्ण देशभर चर्चा होत आहे.



