महाराष्ट्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आयएनएस विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी साजरी..

महाराष्ट्र: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.त्यांनी सांगितले की, विक्रांतवरील दिवाळी हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे. मोदींनी नौदल जवानांचे समर्पण आणि  देशसेवेबद्दल कौतुक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. सोमवारी त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, यावर्षी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील नौदल जवानांसोबत दिवाळी साजरी करणे हे मी माझे भाग्य समजतो.

विमानवाहू जहाजावर रात्र घालवण्याचा अनुभव आठवत त्यांनी कर्मचाऱ्याना सांगितले की, “मी कालपासून तुमच्यामध्ये आहे आणि प्रत्येक क्षण मी तो क्षण जगण्याबद्दल काहींतरी नवीन शिकलो आहे. तुमचे समर्पण इतके उच्च आहे की जरी मी ते जणू शकलो नसलो तरी मी ते नक्कीच अनुभवले आहे. या काळातून किती कठीण असेल याची मी कल्पना करू शकतो.”

पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, रात्री खोल समुद्र आणि सकाळी सूर्योदय पाहणे ही त्यांची दिवाळी आणखी खास बनवते. ते म्हणाले, “आज, एका बाजूला अनंत क्षितिज आहे, अनंत आकाश आहे आणि दुसऱ्या बाजूला हे भव्य आयएनएस विक्रांत आहे, जे अनंत शक्तीचे प्रतीक आहे. समुद्राच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची चमक शूर सैनिकांनी पेटवलेल्या दिवाळीच्या दिव्यांसारखी आहे.”

पंतप्रधान म्हणाले की, नौदल कर्मचाऱ्यांच्या देशभक्तीपर गाणी गाताना आणि ऑपरेशन सिंधूचे चित्रण करताना पाहून, “युद्धभूमीवर सैनिकाला काय वाटते हे शब्दात वर्णन करता येत नाही.” ते म्हणाले की, ऑपरेशन सिंधू दरम्यान, विक्रांते पाकिस्तानी झोप उडवली होती. ते म्हणाले की आयएनएस विक्रांतचे शौर्य पाहून शत्रू देशाने गुडघे टेकले होते. पंतप्रधाननी सैनिकांना सांगितले की, भारताचे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत हे भारताच्या सशस्त्र दलांची क्षमता प्रतिबिंबित करते. ऑपरेशन सिंधूर दरम्यान काही दिवसांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले होते. पंतप्रधान म्हणाले की ऑपरेशन सिंधूर दरम्यान तिन्ही दलांमधील असामान समवन्यमुळे पाकिस्तानला इतक्या लवकर नमवावे लागले.

पंतप्रधानांनी आयएनएस विक्रांत हे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे एक महान प्रतीक असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की ज्या दिवशी देशाला स्वदेशी आयएनएस विक्रांत मिळाला, त्या दिवशी भारतीय नौदलाने गुलामगिरीचे एक प्रमुख प्रतीक सोडून दिले होते. भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरित केलेला एक नवीन ध्वज स्वीकारला. महासागरातून जाणारा स्वदेशी विक्रांत हा भारताच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!