मुंबई,दि.१७:तौक्ते चक्रीवादळाने मुंबईला चांगलाच तडाखा दिला असून, पहाटे पासून सुरु असलेला धुवांधार पाऊस व जोरदार वारे यांनी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. दादर येथील हिंदमाता व लगतच्या परिसरात पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई महापालिके च्या रेस्क्यू टीम्स कार्यरत झाल्या असून ठिकठिकाणी पडलेले वृक्ष छाटणी चे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना घरातच थांबण्याचे आवाहन केले असून सायंकाळी उशिरा पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आपली काळजी घ्यावी व अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये असे म्हटले आहे.