कोंकण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शिवसेना नेत्यांच्या बैठकीत दिले आश्वासन..

नवी दिल्ली,दि.२:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल, असे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील चौपदरीकरणाचे काम अद्यापही बंद आहे. ठेकेदार कंपनी बदलूनही या कामात फारशी सुधारणा झालेली नाही. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रलंबित प्रश्‍न, रस्त्यांचे प्रकल्प, विविध विकास कामांसंदर्भातील निवेदन नितीन गडकरी यांना देण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग  चे पालकमंत्री  उदय सामंत, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!