मुंबई

जनसेवा : गायकवाड कुटुंबियांनी गरजूंना दिला मदतीचा हात!

मुंबई: जनसेवा हिच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे सुनील गायकवाड कुटुंबियांनी जनसेवेमध्ये स्वत:ला समर्पित केले आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. विशेष म्हणजे हे कुटुंबिय प्रसिध्दीपासून खूप लांब आहे.

आपल्या समाजसेवेचा गाजावाजा न करता समाजातील गरजू व उपेक्षित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सुनीलभाऊ गायकवाड व मंगलाताई गायकवाड यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या 500 पेक्षा अधिक गरजू कुटुंबियांना गायकवाड कुटुंबिय मालाड पूर्व शाह आर्केड येथील लुंबिनी बुध्द विहार येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत.

मागीलवर्षभरापासून त्यांनी विविधजातीधर्मातील गरजू कुटुंबियांना प्रतीमहीना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करीत आहेत.
सोबतच या गरजू कुटुंबियांच्या ईतर कौटुंबिक समस्या सोडविण्याचे कामदेखील हे पती पत्नी करीत आहेत. सुनील गायकवाड हे भीम आर्मी या संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष असून त्यांची पत्नी मंगलाताई गायकवाड या भीम आर्मीच्या माजी कोषाध्यक्षा तसेच गुलमोहर सोशल फाऊंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. वर्षभरापासून चाललेले त्यांचे हे कार्य यावर्षी सुध्दा विनासायास खंड पडू न देता सुरूच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!