ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुंबईसह राज्यातील रेस्टॉरंट, बार व हॉटेल १५ मे नंतरही राहणार बंद !
आहार संघटनेने चा निर्णय..
मुंबई,दि.१०:मुंबईसह राज्यातील रेस्टॉरंट, बार व हॉटेल १५ मे नंतरही बंदच राहतील, अशी भूमिका रेस्टॉरंट व बारचालकांच्या आहार संघटनेने जाहीर केली आहे. बहुतांश रेस्टॉरंट व बारमधील कामगार गावाकडे गेले असून, १५ मेनंतर व्यवसायास परवानगी मिळाली, तरी प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यास १० दिवसांचा अवधी लागेल. दरम्यान, डबघाईला आलेल्या रेस्टॉरंट, बार व हॉटेलचालकांना आर्थिक दिलासा सरकारने द्यावा, अशी मागणी या उद्योगातून होत आहे.