महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेचे खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही नीती आमच्या काही नेत्यांची-आ.योगेश कदम यांचा अनिल परबांना टोला

दापोली:- राज्यात नुकतीच नगरपंचायत निवडणुकीचे रणधुमाळी शांत झाली आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या नगरपंचायतीच्या निकालानं शिवसेनेमध्ये सध्या चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेनेने या दोन्ही नगरपंचायतीची जबाबदारी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर दिली होती.

यातच या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पारड्यात मतदारांनी सकारात्मक कौल दिला. मात्र, राष्ट्रवादीला यातील सर्वाधिक जागा मिळाल्या.तर मंडणगडमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पराभूत झाले आणि अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या. या प्रकारावरून शिवसेना आमदार योगेश कदम यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

‘शिवसेनेचे खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवानं आमच्या काही नेत्यांमध्ये आहे’, असा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला आहे.

या टिकेनंतर राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अशात योगेश कदम यांनी केलेला आरोप चर्चेचा विषय ठरतोय. त्यामुळे येत्या काळात कदम विरुद्ध परब हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!