मुंबई

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत…!

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

मुंबई- राज्यातअभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना येत्या २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्यामुळे आता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील (एसईबीसी) विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

राज्य विधिमंडळाच्या २० फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडलेल्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम (एसईबीसी) २०२४ एकमताने संमत करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आणि शासकीय तसेच निमशासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षणही देण्यात आल्याने याचा फायदा प्रामुख्याने मराठा समाजाला झाला आहे.

एसईबीसी अधिनियमाचा फायदा घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन प्रमाणपत्र सादर करण्यास वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याच्या सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी आज घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!