गोरेगाव मिररमुंबई

आरे कॉलनीतील आदिवासींना मिळाला राष्ट्रवादीकडून मदतीचा हात

मुंबई,दि.२९: तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या मुंबईच्या पवई, आरे कॉलनी पेरूवाडीतील आदिवासी बांधवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवई, पेरूपाड्याला भेट देत तेथील आदिवासी बांधवांना राष्ट्रवादीकडून सर्वोतोपरी मदत सुर्पूद केली.

एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व राज्याचे नगरविकास तथा शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांना पुन्हा नव्याने संसार उभा करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली आहे.

आरे कॉलनतील पेरू पाड्यात तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आदिवासींचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी दिले होते. त्या वचनाची पूर्तता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याने स्थानिक आदिवासी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!