रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीचे दोन प्रकल्प – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद, झाडगाव एमआय डीसी मध्ये तब्बल २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. तरं उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स,एटीएमपी,फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत,मुख्य सचिव सुजाता सौनिक,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.
दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा असून तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.त्याद्वारे ४५०० रोजगार निर्मिती होणार आहे.तरं एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच अतिविशाल प्रकल्प असल्याचां दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. या बैठकीत वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सिलीकॉन वेफर्स, फॅब,एटीएमपी निर्मितीचा राज्यातील हा तिसरा अतिविशाल प्रकल्प आहे.तसेच हा प्रकल्प वाटद व झाडगाव एमआयडीसी या भागात होणार असून या प्रकल्पामध्ये १९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक होणार आहे.त्यातून ३३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सदर प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होणार आहे.