महाराष्ट्र

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री विधानभवनात येणार का? संजय राऊत म्हणाले..

मुंबई – राज्यात हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यातच आज अधिनेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरुन विरोधक आणि समाज माध्यमांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अधिवेशनात गैरहजर राहिले. पण, अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला.

खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, ‘अधिवेशन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री आहेत तिथूनच अधिवेशन नियंत्रित करत आहेत, त्यांचे सभागृहाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष आहे. ते सरकारच्या कामकाजातही सहभागी होत आहेत’,अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रावरून निशाणा साधला होता. यावर सुद्धा संजय राऊतांनी भाष्य केले. ‘राज्यपाल हुशार आहेत, विद्वान आहेत. पण त्यांना अभ्यास आणि विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचे आरोग्य खाते उपचार करायला सक्षम आहे,’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी मारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!