कोंकण

लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्याने मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले

आमदार भास्कर जाधव यांचा आरोप

खेड l कोकणातील लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्यामुळेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या अतिशय  महत्वाच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे असे मत गुहागर-खेड मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. काल

खेड तहसिलदार कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा ६६ क्रमांकाचा राष्ट्रिय महामार्ग अतिशय महत्वाचा आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ साली उद्धघाटन केले तेव्हा २०१६ झाली चौपदरीकरणाचे काम पुर्ण होईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता २०२१ उजाडला तरी चौपदरीकरणाचे काम पुर्ण झालेले नाही.

अन्य दोन राज्यांना जोडणाऱ्या महामार्गांची कामे वेळेत पुर्ण झालेली आहेत. मात्र महामार्ग क्रमांक ६६ हाच याला अपवाद आहे. खरतर कोकणातील लोकप्रनिधींची लिडरशिप कमी पडत असल्याने महामार्गाचे काम रखडले असावे असे मत त्यांनी मांडले. 

दापोली, खेड आणि गुहागर या तीन्ही तालुक्यांच्या विकास कामांबाबत बोलताना ते म्हणाले, गेले दीड वर्षे कोरोनामहामारीचा सामना करता करता गेले आहे. अजुनही ही लढाई सुरुच आहे. सर्वसामान्य जनता, लोकप्रतिनिधी, शासकिय अधिकारी सारेच या महामारीचा सामना करत आहेत. याचा

परिणाम विकास कामांवर होवू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून या दोन मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खेड तहसिल कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीला दापोली-खेडचे आमदार योगेश कदम तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!