महाराष्ट्रमुंबई

वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कशेडी बोगद्यातून जीवघेणा प्रवास.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला असला तरी सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांचा पुन्हा जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. वीजेअभावी वाहनचालकांची फसगत होत आहे. अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे. कशेडी बोगद्याच्या उभारणीपासून चर्चेचा विषय ठरलेल्या दोन्ही बोगद्यात सातत्याने ऐनकेन कारणांचे स्पीडब्रेकरच उभे ठाकत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही बोगद्यात लागलेली गळती राष्ट्रीय महामार्ग खात्याने थोपवत वाहनचालकांना दिलासा दिला होता, मात्र गळतीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून वाहनचालकांची कसरत सुरू आहे. या समस्येत आता खंडित वीजपुरवठ्याचीही भर पडली आहे. एप्रिल-मे महिन्यात दोन्ही बोगद्यातून कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाल्याने वाहनचालक सुखावले होते. मात्र, सद्यस्थितीत खंडित वीजपुरवठ्याची नवी समस्या उभी ठाकली आहे. भुयारी मार्गिकेतील दिवे बंद पडत असल्याने वाहनचालक बुचकळ्यात पडत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!