महाराष्ट्रमुंबई

रस्त्याची कामे पुर्ण केल्याचा अहवाल पंधरा दिवसात द्या ! -आशिष शेलार यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई :  मुंबई उपनगरात ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत ती ३१ मे पर्यंत पुर्ण करा, आता कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका, रस्त्याची कामे पुर्ण केल्याचा अहवाल रस्ते निहाय पंधरा दिवसात द्या ! पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या अशा सूचना आज मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

आज वांद्रे पश्चिम विभाग सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि संबधित अधिकारी उपस्थित होते.

एच पश्चिम विभागातील वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम मधील चालू असलेल्या ७४ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामे सुरु आहेत. आज पाहणीनंतर त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले.

१. प्रत्येक रस्त्याप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या उपयुक्तच्या समन्वयाच्या अंतिम तारखा ठरवणे आणि ३१ मे आधी ते पूर्ण करून घेणे.
२. ज्या ठिकाणी युटीलीटी आहे त्यांचे नुकसान झाले असेल त्याचा अहवाल मुंबई महापालिकेने घ्यावा, एच पश्चिममध्ये त्यावर काय कारवाई करणार ? ३१ मे आधी कसं पूर्ण करणार ? त्याचं वेळापत्रक पूर्ण करावं.
३. जे रस्ते फेज -१ आणि फेज – २ या दोन्ही कंत्राटदाराच्या पॅकेजमधले जे मोठे रस्ते आहेत ते ३१ मे पर्यंत होतील तेवढे पूर्ण करावे, नवीन रस्ते खोदू नये हे निर्देश दिले.
४. गुरु नानक पार्क, खार जिमखाना, बांद्रा जिमखाना, दौलत नगर आयलँड येथील वर्तुळाकार रस्ते मधुपार्क सहित सांताक्रूझ पर्यंत पूर्ण करावे.
५. अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक रस्त्याशः पूर्णत्वाचा अहवाल १५ दिवसांत द्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!