महाराष्ट्रमुंबई

राज्यात दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ – आता प्रति पान ४० रुपये!

मुंबई : महाराष्ट्र राज्यात मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी करणे आता आणखी महाग झाले आहे. राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात प्रति पान २० रुपयांवरून थेट ४० रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅनिंग आणि हाताळणीसाठी यापूर्वी प्रति पान २० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, राज्य शासनाने आता या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन दर प्रति पान ४० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!