नवी दिल्ली

दिल्लीतील महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गट सहभागी होणार नाही

दिल्ली : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा जगभरातील संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजता दिल्लीत ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. कॉंग्रेससह अनेक पक्षांनी केंद्र सरकारकडे बैठक घेण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर आज सायंकाळी ही बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अपरिहार्य कारणामुळे आमचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. अनुपस्थित राहण्याबद्दल अरविंद सावंत यांनी खेद देखील व्यक्त केला आहे. भ्याड हल्याचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!