राज्यात ४ ते ६ जुलैदरम्यान जोरदार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

ते ६ जुलैदरम्यान मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर क्षेत्रासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


या कालावधीत स्थानिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची तसेच काही ठिकाणी पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशेषतः सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच घाट रस्त्यांवर अनावश्यक प्रवास टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.

आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक:

  • बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916
  • पालघर: 02525 297474 / +91 82379 78873
  • ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
  • ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101
  • पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

नागरिकांनी हवामान स्थिती लक्षात घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!