ब्रेकिंग

…तर सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई- देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांतील शाळा, महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे.

याबाबतचे संकेत स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!