निवृत्तीनंतरही अशोकराव नगरकर यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि योगदान निरंतर सुरू राहील 

 

लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांचा विश्वास

मुंबई / रमेश औताडे 

मुख्याध्यापक अशोकराव नगरकर यांनी आपल्या ३२ वर्षाच्या सेवाकाळात शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांना प्राधान्य दिले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. निवृत्तीनंतरही समाजासाठी त्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि योगदान निरंतर सुरू राहील असे मनोगत भाषणात लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले. 

राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव नगरकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.जुन्नर येथील आदिवासी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी देवराम मुंढे, सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे, निवृत्त शिक्षणाधिकारी अशोकराव कडलग, आदिवासी शिक्षण संस्थेचे संचालक रावते, रिपब्लिकन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस, मा.पंचायत समिती सदस्य कल्याणशील देखणे, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर,सचिव रामदास पवार, भाजपचे खेड ता.उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,उद्योजक प्रशांत म्हसुडगे, अनिल दौंडकर, गणेश माशेरे, निवृत्त बँक अधिकारी भगवान खरपुडे, मुख्याध्यापक रामदास रेटवडे, निवृत्त मुख्याध्यापक मनोज वाघमारे, सुरेश क्षीरसागर, हुतात्मा राजगुरु विद्यालयातील शिक्षक तसेच तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देवराम मुंढे यांनी आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर या संस्थेच्या विविध विद्यालयात अशोकराव नगरकर यांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद असल्याचे नमुद केले. प्राध्यापक मुरलीधर मांजरे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!