अखेर राज्यातील देवळांची कुलुपे उघडणार ! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून होणार राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली
आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री

मुंबई: कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर अनेक महिन्यांपासून बंद असणारी राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.
धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.