महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारांची गर्दी, राजकीय कुरघोडीचा बाजार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांमधून मुख्यमंत्रिपदासाठी तब्बल डझनभर दावेदार समोर आले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना (शिंदे) पक्षातून पुन्हा दावेदार आहेत तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाची उघड मागणी केली आहे.

भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात, मात्र विनोद तावडे यांचे नावही चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये सर्वाधिक चार दावेदार आहेत. त्यात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे नेतृत्व असलेल्या गटात सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे दावेदार असून अजित पवारांच्या गटात फक्त अजितदादाच दावेदार मानले जात आहेत.

राज्यात २८८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत कोणत्याही गटाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान १४५ जागा जिंकणे आवश्यक आहे. यामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अजित पवार) महायुती एकीकडे उभी आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या या चढाओढीत महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!