मुंबई

‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; आरेत उभारणार ५ लाख झाडांचे हरित आवरण

आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण; हरित मुंबईसाठी मोठा संकल्प

मुंबई, दि. ५ जून : मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आरे परिसरातील सुमारे ८० एकर रिक्त जागेवर ५ लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री Ashish Shelar यांनी दिली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरे कॅम्प परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “आरेला जंगलाचा दर्जा केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दाट हिरवाईने नटलेले, समृद्ध आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने ८० एकर क्षेत्रात ५ लाख झाडांच्या लागवडीची आजपासून सुरुवात होत आहे.”

आरेत घडणार हरित क्रांती; ८० एकर क्षेत्रात वृक्षलागवडीचा संकल्प

या कार्यक्रमास आमदार Murji Patel, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी Saurabh Katiyar, कोकण विभागीय आयुक्त Rubal Agrawal, प्रभाग समिती अध्यक्ष Prakash Musale तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पालकमंत्री आशिष शेलार यांनी आरे कॅम्प, मेट्रो कारशेड परिसर, मेट्रो भवनाच्या राखीव जागा, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, फोर्स वन, महानंद डेअरी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या अहवालानुसार या विविध ठिकाणी मिळून सुमारे ८० एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले.

ही मोहीम केवळ झाडे लावण्यापुरती मर्यादित नसून मुंबई उपनगरासाठी दीर्घकालीन हरित वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम आहे, असे शेलार यांनी नमूद केले. वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि विशेष देखरेख यंत्रणा उभारण्यात येणार असून प्रत्येक वृक्षाच्या वाढीवर आणि टिकावावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.

पारंपरिक वृक्षारोपणासोबतच घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगले विकसित करण्यासाठी मियावाकी पद्धतीचाही वापर करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधत मुंबई उपनगर अधिक हिरवे, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!