महाराष्ट्रमुंबई

लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य

मुंबई : लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कुणावरही कारवाई करणार नाही असेही अजित पवार म्हणाले. पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. दोन-तीन महिन्यातच लगेच निवडणूक लागू होणार होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. ही योजना आणताना आम्ही आवाहन केलं होतं की ज्या गरजू आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा. ज्या गरजू नसतील त्या महिला अर्ज करणार नाही असे आम्हाला वाटलं होतं. पण त्यांनीही अर्ज केला आणि लाभ घेतला. ही योजना राबवताना चूक झाली. असे असले तरी दिलेले पैसे आम्ही काढून घेणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!