महाराष्ट्रवाहतूक

अपघातमुक्त समृद्धीकडे पाऊल; दर ५० किमीवर मिळणार विश्रांतीची सोय

समृद्धी महामार्गावरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी नव्या उपाययोजना राबवणार

समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता समृद्धी महामार्गावर दर ५० किलोमीटर अंतरावर विश्रांती केंद्रे (Rest Stops) उभारण्यात येणार असून, त्यामुळे थकवा आणि झोपेमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी २०० किलोमीटरपर्यंत विश्रांतीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान वाहनचालकांचा थकवा वाढतो आणि अपघातांचा धोका निर्माण होतो. यावर उपाय म्हणून दर ५० किलोमीटरवर विश्रांती केंद्रे विकसित करण्याची योजना राबवली जात आहे.

गेल्या तीन वर्षांत समृद्धी महामार्गावर अनेक गंभीर अपघात झाले असून शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट्स’ ओळखून त्यांचे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र अपघात विश्लेषण कक्षही कार्यरत करण्यात आला आहे. या माध्यमातून अपघातांची कारणे, रस्त्यांमधील त्रुटी आणि आवश्यक सुधारणा यांचा अभ्यास केला जाणार आहे.

याशिवाय अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, हेल्मेटचा अभाव आणि धोकादायक पार्किंग यावरही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महामार्गावरील मृत्यूंचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांवर भर दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!