महाराष्ट्र

आम्ही एकत्र असलो तरी आम्ही विचारधारा सोडली नाही – अजित पवार

पुणे – राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची आज इंदापुरात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, काहींना तिकीट द्यायचं होतं आणि पक्ष प्रवेश करायचा होता म्हणून उशीर झाला. सगळ्यांना आमदार व्हायचं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी झाली, तिसरी आघाडी झाली आहे. राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची पहिली 38 आणि आज 7 जणांची यादी जाहीर झाली आहे. आणखी नावांची यादी जाहीर होणार आहे. याचा पत्ता कट आणि त्याला उमेदवारी असे काही लिहू नका. काही जागांबाबत आमची दिल्लीत चर्चा सुरू आहे. महायुतीत 288 पैकी 11 जागा कुणी लढायचं हे ठरवायचं बाकी आहे. बाकी सगळं ठरलं आहे. आम्ही एकत्र असलो तरी आम्ही विचारधारा सोडली नाही. माझ्यातील 10 टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देणार आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबत काम करणार आहे, असंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!