शैक्षणिकमहाराष्ट्रशासकीय अध्यादेश

इंजिनियरिंग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; नापास झाल्यासही पुढील वर्षाला प्रवेश

 मुंबई:इंजिनियरिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने निर्णय घेतला आहे . आता विद्यार्थ्यांना “कॅरीऑन” या पर्यायाचा विचार न करता पुढच्या वर्गात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून त्यांना उत्तम नोकरी आणि रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंभियांत्रिकीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. दहावीच्या वर्गात नापास झालेल्या उमेदवारांना ऐटीकेटीच्या माध्यमातून अकारावीला प्रवेश मिळतो. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

इंजिनियरिंगचे शिक्षण घेताना जर एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षात काही विषयात नापासा झाला तर त्याला तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत नाही. तीनपेक्षा जास्त विषयांमध्ये विद्यार्थी नापास नसावा, अशी अट आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाचे सर्व विषय क्लिअर असावे लागतात. अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षात नापास झालेल्या विषयात पास होणे गरजेचे आहे. परंतु आता या निर्णयात काही बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कॅरीऑन या पर्यायाचा विचार न करता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शिक्षण पूर्ण करावेत. यामुळे त्यांना चांगली नोकरी आणि रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे आवाहन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!