बैलगाडा शर्यतीचा पुन्हा उडणार धुरळा! शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

नवी दिल्ली:- राज्यातील बैलगाडा चालक आणि मालक यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यातील बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी उठवली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये बैलगाडा शर्यती विषयीची महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा चालक आणि मालकांचे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान आज सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवली आहे.
मुंबई हायकोर्टाने २०१७ मध्ये या बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. या बंदीला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. यानंतर गेल्या चार वर्षांपासून बैलगाडी शर्यतीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. आज अखेर सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली लावत बैलगाडा शर्यतींवर असलेली बंदी उठवून बैलगाडा चालक आणि मालक यांना दिलासा दिला आहे.
बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठावी यासाठी शेतकरी वर्गाकडून जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलनं उभी राहत होती.यादरम्यान राज्यातील शेतकरी नेते ही बंदी उठावी यासाठी प्रयत्न करत होते.आज अखेर या सर्व प्रयत्नांना यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.शेतकरी वर्ग तसंच बैलगाडा चालक-मालकांकडून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडून या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश-उपमुख्यमंत्री अजित पवार
“राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.