महाराष्ट्र

दिलासादायक: कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

काल दिवसभरात १०,३५३ जणांची कोरोनावर मात

मुंबई:  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. काल बुधवारी दिवसभरात १० हजार ३५३ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.०२ टक्के इतकं झालं आहे. त्याचबरोबर राज्यात आज ९ हजार ७७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६० लाख ६१ हजार ६०४ इतकी झाली आहे. तर करोनामुळे १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. राज्यात १ लाख १६ हजार ३६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात ६ लाख १७ हजार ९२६ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार १७३ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईतही कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होत आहे. गेल्या २४ तासात ६९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण आकडा ६ लाख ९६ हजार १०५ इतका झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण हे ९६ टक्के आहे.

सध्या मुंबईत ८ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ७१६ दिवसांवर पोहोचला आहे. २३ जून ते २९ जूनदरम्यान कोविड रुग्ण वाढीचा दर हा ०.००९ टक्के इतका होता. ठाण्यात (१६, ११५), पालघर (१,४१८), पुणे (१७,४०७), कोल्हापूर (११,४४४), नाशिक (३,४९४), औरंगाबाद (१,३००), नागपूर (३,००३) करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

देशात मंगळवारी ३६ लाख ५१ हजार ९८३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी २७ लाख ४२ हजार ६३० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ९ हजार ३५३ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ वर पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!