महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच! रत्नागिरी जिल्ह्यात १६०० जणांनी निवडला ‘समलिंगी लाईफ पार्टनर’

रत्नागिरी :- न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता दिल्याने समलिंगी विवाह करणार्‍यांची संख्याही आता रत्नागिरी जिल्ह्यात वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८०० जोडप्यांनी समलिंगी विवाह केला आहे.यात नोंदणी न झालेल्यांची संख्या अधिक असू शकते. यात पुरुषांसह स्त्रियांचीही नोंदणी करण्यात आली आहे.

पूर्वी समलिंगी विवाह हा गुन्हा होता. कलम 377 नुसार हा गुन्हा सिद्ध झाल्यास दंड ठोठवण्यात येत होता. गुन्हेगारांना दहा वर्षे शिक्षाही दिली जात होती. मात्र अलिकडेच भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार समलिंगी विवाह करण्यात येत आहेत. मात्र, याची नोंदणी अनेकांनी केलेली नाही.

सध्या समलिंगी विवाहाला मान्यता मिळाल्यापासून समलिंगी विवाह जुळवून देणाऱ्या संस्थाही रत्नागिरी जिल्ह्यात तयार होत आहेत.त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील समलिंगी विवाह करणाऱ्यांचा आकडाही वाढण्याची चिन्ह आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!