महाराष्ट्र

राणे-ठाकरे तुलना होऊ शकत नाही – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग- मुंबईत मराठी माणसाला कोणी न्याय दिला, मराठी माणसाला कोणी टिकवलं, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी टिकवली त्यांना ठाकरे म्हणतात. त्यांची तुलना राणेंशी होऊ शकत नाही अशी खोचक प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. एक जागा निवडून येणाऱ्या माणसाची ठाकरेंशी तुलना करणं चुकीचं,असा टोला आमदार दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला.

राणेंच्या माणसांनी श्रीधर नाईक यांची हत्या केली तेव्हा त्यांचा आणि आमचा वाद होता का? असाही सवाल यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. सत्यविजय भिसे यांची दिवसाढवळ्या हत्या झाली हे सर्व घडत असताना तुमची आणि ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही. बाळासाहेबांमुळे तुम्हाला योगायोगाने एक पद मिळालं त्याला सुद्धा ही लोकं विसरले,असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.

राज्यात आमची सत्ता आहे, तरीदेखील आम्ही कायदा हातात न घेता राणेंना सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. जर आम्ही सत्तेचा वापर केला असता तर नितेश राणेंची जेलमध्ये नाही हॉस्पिटलमध्ये रवानगी केली असती. हीच गोष्ट सिद्ध करते इथे सत्तेचा वापर केला जातो की नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे एखादा राजकीय नेता वळतो तेव्हा त्याच्यावर यासाठीच शिक्षा करावी लागते की तो पुन्हा अशा घटना करणार नाही,असे मत दिपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!