कोंकणमहाराष्ट्र

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा नाही -मंत्री उदय सामंत

शिवसेना सोडून गेलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेवू नका

दापोली: पक्षाचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेले निर्णय आपल्याला मान्य करायलाच हवेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, ती जागा दुसर्‍या कोणाला देण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा सोडण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. आघाडी करायची असेल तर हा निर्णय आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सोडू तोपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करूया, असे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी केले.

दापोली येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहात शिवसेना कार्यकर्ता मेळावा झाला. शिवसेना सोडून गेलेल्यांना लवकरच पश्‍चाताप, भ्रमनिरास होईल. मात्र त्याना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेवू नका. भाजबद्दल बोलताना ते म्हणाले, येत्या निवडणुकीत त्यांना राज्यातील जनता मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!