महाराष्ट्रकोंकण

भारत-पाक तणावाचा फटका! गोव्यात पर्यटन ठप्प, हॉटेल बुकिंग्ज रद्द

मुंबई : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. राज्यातील हॉटेल व्यवसायावर याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत असून, आधी सुमारे ५५ टक्के ओक्युपंसी असलेली हॉटेल बुकिंग आता ३५ टक्क्यांवर आली आहे. यामुळे सुमारे २० टक्के नुकसान हॉटेल व्यावसायिकांना सहन करावे लागत आहे, अशी माहिती गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी दिली. सुखिजा यांनी सांगितले की, देशातील सध्याच्या अस्थिर स्थितीमुळे हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आली आहेत. किनारी भागातील हॉटेल व्यावसायिकांना याचा अधिक फटका बसला आहे. अनेक पर्यटकांनी बुकिंग केल्यानंतर ते रद्द केले, ज्यामुळे पर्यटन व्यवसायात मोठे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!