कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; माकडे-वानरे पकडल्यास मिळणार ६०० रुपये प्रति माकड!
उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारची नवीन कार्यपद्धती जाहीर

मुंबई; कोकणात माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. माकडे आणि वानरांमुळे वाढत चाललेल्या संघर्षावर विचार करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २४ नोव्हेंबर रोजी नवीन कार्यपद्धती जाहीर केली आहे.
आता मिळणार प्रोत्साहन भत्ता:
* १० माकडे पकडल्यास: प्रति माकड ६०० रुपये मिळणार.
* १० हून अधिक माकडांसाठी: प्रति माकड ३०० रुपये मिळणार.
* याशिवाय, १ ते ५ माकडांच्या प्रकरणात अतिरिक्त १,००० रुपयांचा प्रवास भत्ता (Travel Allowance) देण्यात येणार आहे.
वाढता उपद्रव:
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच कोकणातील इतर भागांत गेल्या काही वर्षांपासून माकडांच्या वाढत्या आयुर्वेदामुळे शेतीत हस्तक्षेप दिसून येत आहे. शेतातील फळे, भाजीपाला, घरातील धान्य, वस्तूंचे मोठे नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर माणसे जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गाव पातळीवर तक्रारी वाढत असताना त्यावर एकसंध धोरण नसल्याने लोक त्रस्त होते.
अंमलबजावणी:
वनपरिक्षेत्रे, गाव, शहर व नगरपालिकांकडून तक्रारी संबंधित अधिकारी घटनास्थळी पाहणी करतील व उपद्रवी माकडांची संख्या, नुकसानीचे स्वरूप तपशील नोंदवतील. सहायक व वनसंरक्षकांच्या आदेशानंतर प्रशिक्षित पथकाकडून जबाबदारीने माकडांना पकडण्याची कार्यवाही केली जाईल.





